फोटो: “सिंटीला २k१८” उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष
मा.श्री.रवींद्रजी माने,कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर
सुर्वे, प्राचार्य डॉ.महेश भागवत
जनरल चॅंम्पियनशिपची ट्रॉफी
स्विकारताना राजेंद्र माने तंत्रनिकेतनचे विद्यार्थी व उपस्थित मान्यवर
देवरुख वार्ताहर:
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक
संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “सिंटीला २k१८” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे आयोजन
करण्यात आले. इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा लक्षात
घेता त्यांच्या सुप्त कल्पना विकसित व्हाव्यात,अभ्यासक्रमातील ज्ञानाचा वापर करून
त्या आमलात आणता याव्यात तसेच त्याचा वापर इतर तंत्रज्ञ व समाजासाठी व्हावा हा
विचार त्यांच्यामध्ये जागृत व्हावा या उद्देशाने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील
काही वर्षे “सिंटीला” चे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करते.यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनीकरिता
नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश असतो.
१६ ते १७ फेब्रुवारी दरम्यान
महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात विविध स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये पेपर
प्रेझेंटेशन,कॅलसी वॉर,लॅन गेमिंग,प्रोग्रामिंग,फुट्साल,कार क्विझ,रोबो रेस,ग्रीन
टेक्नोमॉडेल,स्पॉट फोटोग्राफी यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता.परिषदेचे
उद्घाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी
माने यांच्या शुभहस्ते कार्यकारी अध्यक्षा सौ.नेहाजी माने,उपाध्यक्ष श्री.मनोहर
सुर्वे, प्राचार्य डॉ.महेश भागवत, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.एन
बी.भोपळे, संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे,समन्वयक प्रा.राहुल दंडगे,
प्रा.गणेश जागुष्टे,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व सहभागी स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या उपस्थितीत पार
पडले. मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रथम संयोजक डॉ.एस.एन.वाघमारे यांनी परिषदेचा उद्देश
स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी उपस्थितांना महाविद्यालयाची उज्ज्वल कामगिरी व विशेष
प्रगतीचा आलेख मांडला व विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या अध्यक्षीय
भाषणात म्हणाले की उद्याचा भारत घडविण्यासाठी कुशल व जाणत्या विद्यार्थ्यांची गरज आहे. अशाप्रकारच्या स्पर्धा व उपक्रम हे विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम करतात.
परिषदेच्या दुस-या दिवशी संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा
सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य
प्रा.एन बी.भोपळे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व
प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.सहभागी विद्यार्थ्यांनी
आपल्या मनोगतात कॉलेजचा निसर्गरम्य परिसर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य
यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले.
यावर्षी ही परिषद तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली होती व “जनरल
चॅंम्पियनशिप” स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. जनरल चॅंम्पियनशिपची ट्रॉफी आंबव
येथील राजेंद्र माने तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पटकावली.
आभारप्रदर्शन प्रा. राहुल दंडगे यांनी
केले.संपूर्ण परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. राहुल दंडगे व प्रा.गणेश जागुष्टे
यांनी काम पाहिले.परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी तसेच स्वराज सावंत,अक्षय वारंग,राहुल झोरे,सुशांत
धारवत,आकाश शेलार,ओंकार हेळेकर,सुयोग कोकाटे या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.दोन्ही
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील तांबे व अभिजित मोहिते यांनी केले.
No comments:
Post a Comment