Monday, September 18, 2017

युवा सांस्कृतिक महोत्सवात माने महाविद्यालयाची बाजी !!

 
 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५० व्या युवा सांस्कृतिक महोत्सवामध्ये पारितोषिक पटकावीत महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली.गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या यामहोत्सवामध्ये १७ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी या महोत्सवाअंतर्गत विविध ३१ इव्हेंटमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये विविध पारितोषिके मिळवली.बाहेरील तज्ञांचे कोणतेही मार्गदर्शन न घेता विद्यार्थ्यांनी स्वत:वयक्तिक स्तरावर तयारी करून हे यश मिळवले.यामध्ये एकपात्री अभिनय या विभागात महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाचा शेखर कदम याने प्रथम क्रमांक  मिळवला.तसेच रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनुक्रमे अक्षय पेंढारी आणि सुरज सावंत यांनी द्वितीय क्रमांक पटकावले.पाश्चात्य संगीत प्रकारात सुयोग गोसावी याला उतीजानार्थ पारितोषिक मिळाले.

  सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री.रवींद्र माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष कौतुक केले.महोत्सवाच्या यशस्वी सहभागाबाबत आणि नियोजनामध्ये सौ.गीतांजली खानविलकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment