Tuesday, November 28, 2017

माने अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांचे “एन.पी.टी.ई.एल.” परीक्षेत सुयश!



  


      
     प्रा.अनिकेत जोशी              प्रा.श्वेता बोरकर              प्रा.संदीप भंडारे

 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय,भारतसरकार प्रायोजित  एन.पी.टी..एल. (National Program on Technology Enhanced Learning)” या परीक्षेचे केंद्र असून त्याद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रा. अनिकेत जोशी यांनी “मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट(MIC) या विषयात सुवर्णश्रेणी प्राप्त केली आहे.
  एन.पी.टी..एल.’ ही परीक्षा म्हणजे भारतातील “आयआयटी व आयआयएससी” यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे.याद्वारे विविध तांत्रिक विषयांवर शॉर्ट टर्म व लॉंग टर्म सर्टिफिकेट कोर्सेस घेतले जातात. आयआयटीचे तज्ञ प्राध्यापक अशा अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन करतात.या परीक्षेत ९०% हून अधिक गुण मिळाल्यानंतर सुवर्णश्रेणी व ६०% हून अधिक गुण मिळाल्यास इलाइट श्रेणी दिली जाते.
  सदर परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्रा. अनिकेत जोशी यांनी ९४% गुण मिळवून ही ‘सुवर्णश्रेणी’ प्राप्त केली आहे.याच विभागाच्या प्रा.श्वेता बोरकर यांनीही ‘बेसिक इलेक्ट्रीकल सर्किट(BEC)’ या विषयात ‘उत्तीर्ण’ असे प्रमाणपत्र मिळवले आहे.तसेच प्रा.अनिकेत जोशी व प्रा.संदीप भंडारे यांनी अनुक्रमे “बेसिक बिल्डींग ब्लॉक्स ऑफ मायक्रोवेव्ह इंजिनिअरींग (BBBME)” व “मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट(MIC)” या विषयांमध्ये ६७% व ६५% गुण मिळवत इलाइट श्रेणी प्राप्त केली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये नेहमीच सहभागी होऊन आपले ज्ञानसंवर्धन करतात.
  सदर प्राध्यापकांचे संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. अजित तातुगडे आदींनी अभिनंदन केले.

Wednesday, October 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम‼



  मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
  या वर्षी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल विभागातून रुपेश अवसरे हा विद्यार्थी 8.१८ (CGPA) गुण मिळवून विशेष प्राविण्यासह महाविद्यालयात प्रथम  आला. अभिषेक सुतार व प्रसाद नलावडे ह्या विद्यार्थ्यांनी  ७.६२(CGPA)  आणि ७.५५ (CGPA)  गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा   क्रमांक पटकावला. ऑटोमोबाईल विभागाचा निकाल ९८.७७% लागला.
  माहिती तंत्रज्ञान या शाखेचा महाविद्यालाचा निकाल १००% लागला असून अमोल भागवत हा 8.७३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम आला. रोमा अहिरे आणि विशाखा बाबरदेसाई ह्यांनी अनुक्रमे 8.५६(CGPA)  व ७.७२(CGPA)  गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. संगणक विभागाचा निकाल ९१.१८% लागला असून सायली लोगडे, दीपिका देवरुखकर आणि संकेत गडदे हे अनुक्रमे 8.३४, 8.१९, 8.०३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
  अणुविद्युत व दूरसंचार विभागाचा निकाल ८१.०८ % लागला असून श्रद्धा शिंदे,ऋतुजा भुर्के व अश्विनी भट हे अनुक्रमे 8.२३, 8.१३ व ७.९५ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.एमएमएस विभागाचा निकाल ८६.६७ % लागला असून मसूमा पागरकर,रोहन खामकर,क्रांती सावंत हे अनुक्रमे ६.७६, ६.६८  व ६.४४ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
  यांत्रिकी विभागाचा निकाल ८२.०९% लागला असून अजय पाटील,सिद्धार्थ गुरव आणि प्रथमेश शिर्के हे अनुक्रमे 8.८०, 8.४१ व ७.९० (CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयातील सर्व विभागांमधून एकूण ३२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री.दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.






राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न!


फोटो: वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध ग्रंथांचे वाचन करताना महाविद्यालयातील विद्यार्थी

     डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ग्रंथालय व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .यानिमित्त ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. महावीर साळवी, ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार, प्रा.मिलिंद शिंदे, प्रा.सीमा भुरवणे, ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर , ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  
    विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथालयात उपलब्ध असलेले साहित्य जसे की संदर्भ पुस्तके,ई-बुक्स,ई-रिसोर्सेस,व्यक्तिमत्त्व विकास विषयक पुस्तके,नियतकालिके आदींचा जास्तीत जास्त वापर करावा व वाचनासाठी वेळ द्यावा हा वाचन प्रेरणा दिनाचा प्रमुख उद्देश होता.  यावेळी बोलतांना महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार म्हणाले की विद्यार्थ्यांनी ग्रंथ व डिजीटल साहित्य या माध्यमातून वाचनाचा दिवसातून कमीतकमी एक तास लाभ घ्यावा. यानंतर व्यवस्थापन विभागाची विद्यार्थीनी कोमल जाधव हिने डॉ.ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला . तसेच ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सुचवले .

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा भुरवणे यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रा.मिलिंद शिंदे व ग्रंथालय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांची भेट !!

फोटो:- बैठकी दरम्यान उपस्थित शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर व एमएमएस विभागाचा प्राध्यापक वर्ग
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांनी नुकतीच भेट दिली. विभागाच्या भविष्यातील वाटचालीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी पूरक शैक्षणिक वातावरण व धोरणात्मक बदलांकरीता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी यांनी विभागातील चालू घडामोडी व विभागातील आतापर्यंतच्या कामकाजाचा आलेख मान्यवरांना सादर केला.या बैठकीमध्ये बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेज ऑफ आर्टस,कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज देवगडचे प्राचार्य डॉ.श्री.जी.टी.परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीच्या प्राचार्या व अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.यस्मिन आवटे यांनी विभागामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक ACTIVITY BASED LEARNING (ABL) अंतर्गत व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यात यावे असे सूचित केले. याप्रसंगी आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक मां.श्री.जितेंद्रकुमार यांनी IIM  व इतर उच्च दर्जाच्या व्यवस्थापनातील कॉलेजेसना भेट देऊन आपल्या गुणवत्तेत कशा प्रकारे वाढ करता येईल ते आत्मसात करून तसे धोरण राबवावे असे सुचविले.
  यावेळी बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेजचे बीएमएस विभागप्रमुख श्री.बाळकृष्ण तेऊरवाडकर यांनी व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणता बदल होणे आवश्यक आहे यावर विशेष भर दिला.याप्रसंगी विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व व्यवस्थापन शिक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या सुचवलेल्या  सर्व गोष्टी राबविण्याची हमी दिली. एमएमएस विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या सर्व मान्यवरांनी वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले.हे सर्व मान्यवर एमएमएस विभागाच्या डिपार्टमेंट अॅडव्हायझरी बोर्ड समितीचे सभासद आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांनी संपूर्ण विभागाची प्रवेश क्षमता परिपूर्ण केल्याबद्द्ल विशेष कौतुक केले व सध्या चालत असलेल्या घडामोडींवर व राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांवर समाधान व्यक्त केले.
  अशा बैठका वरचेवर आयोजित करण्यात याव्यात व त्यावर सकारात्मक चर्चा व्हावी व त्याअनुशंगाने बदल करण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासात्मक बदल होईल व विद्यार्थी तो अंगीकृत करतील असे महाविद्यालयाचे चेअरमन श्री. रवींद्र माने यांनी सांगितले.तसेच हा उपक्रम कौतुकास्पद असलेचे त्यांनी नमूद केले.या बैठकीकरता विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी व प्राध्यापक वर्ग यांनी आभार व्यक्त केले.


राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नेचर क्लबतर्फे सेमिनारचे आयोजन


 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर क्लबतर्फे विविध विषयांवर मान्यवरांचे सेमिनार आयोजित करण्यात आले. मान्यवरांची ओळख व प्रास्ताविक नेचर क्लब प्रमुख प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या नेचर क्लब,एन एस एस या विभागांचे समन्वयक व विद्यार्थी, विद्यार्थीनींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाला लांजा येथील आर्टस,कॉमर्स व सायन्स कॉलेजचे डॉ.विक्रांत बेर्डे यांनी ग्रीन ऑडीट यासंदर्भात विस्तृत माहिती दिली.त्यानंतर इको स्पेस ग्रीन,पुणे कंपनीचे डायरेक्टर डॉ.श्रीनाथ कवडे यांनी पर्यावरण जागृती वरील आपल्या सेमिनारमध्ये मानवनिर्मित घडामोडींमुळे होणारी पर्यावरणाची हानीची सर्वांना जाणीव करून दिली व टी टाळण्यासाठीच्या विविध उपायांची सखोल माहिती दिली.बेंगलोर येथील हिमालया कंपनीचे सीएसआर श्री.अनुप महाजण यांनी निसर्गाला गुरु मानून माणसाने मेडिकल व तंत्रज्ञान क्षेत्रात कसे प्रयोग केले व नाविन्यपूर्ण वस्तू तयार केल्या याचे विवेचन केले.सर्व मान्यवरांनी आपल्या संदेशामध्ये निसर्गावरील मानवाचे अवलंबीत्त्व स्पष्ट करून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा बहुमोल सल्ला दिला.तसेच शाश्वत प्रगतीचा सल्ला उपस्थितांना दिला.
  कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.वैभव डोंगरे,प्रा.ओंकार गद्रे,प्रा.गणेश वाफेलकर व नेचर क्लब तसेच एन एस एस चे बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे आयोजनासाठी प्रोत्साहन लाभले.


माने अभियांत्रिकीचा एम.एम.एस. विभागातर्फे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता "परिचय २०१७”चे आयोजन !!




फोटो:-  परिचय २०१७ प्रसंगी प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार , संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, एम,.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी
   राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एम.एम. एस. विभागाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता "परिचय २०१७ या इंडक्शन प्रोग्रामचे  चे नुकतेच आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार, संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, एम.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी उपस्थित होते.
  विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यस्थापन शास्त्राचे शिक्षण अनिवार्य आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीमध्ये यश शोधावे असे मत प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार यांनी व्यक्त केले.त्यांनी विद्यार्थ्यांना समर इंटरनशिप प्रोजेक्ट्ससाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी हमी दिली.यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांनी  विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय उराशी बाळगून पुढे वाटचाल करावी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनीही विशेष मार्गदर्शन केले.
  यावेळी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या मार्कबीज २०१७" या मार्केटींग इव्हेंटमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व एम.एम. एस.च्या विद्यार्थ्यांना व मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेणेत आलेल्या विविध कला गुणांच्या वाढीसाठी सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
   याप्रसंगी एम.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व सकारात्मक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी एम.एम. एस. विभागातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.